महाराष्ट्र

अरुण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे निधन

अरुण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे निधन
अरुण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे निधन फोटो: ठाणे वैभव
सोलापूर: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरुण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 वर्षी आरण्यऋषीं मारुती चित्तमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यावेळी दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती, ते आजारी आणि अंथरुणातचं होते. अखेर, आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली आहे. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती करत पाच लाख किमी प्रवास केला. 13 भाषांचे ज्ञान त्यांना होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती, त्या माहितीची नोंद केलेल्या व 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या त्यांच्याकडे आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन त्यांनी पूर्ण केले. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600