क्रीडा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा निकाल आज लागण्याची दाट शक्यता

भरभरून प्रतिभा असलेल्या भारताच्या शुभमन गिलच्या बॅटमधून अखेरकर धावा आल्या. रविवारी, त्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर एक शानदार शतक झळकावले. भारताने दिवसाची सुरुवात 171 धावांच्या आघाडीने केली. त्यांचे सगळे विकेट्स हातात होते. यजमानांनी आणखी 227 धावा जोडून इंग्लंडसमोर विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताच्या दुसऱ्या डावात गिलने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 147 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 104 धावा ठोकल्या. दिवसाच्या दुसऱ्या आणि चौथ्या षटकात कर्णधार रोहित शर्मा (13) आणि यशस्वी जैस्वाल (17) ही सलामीची जोडी गमावल्यानंतर गिलने श्रेयस अय्यर (29) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नंतर, अक्षर पटेल (45) याने गिलसोबत हात मिळवणी करत पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. एका टप्प्यावर पाच गडी बाद 211 धावा अशी परिस्थिती असताना भारताने त्यांच्या उर्वरित पाच विकेट्स केवळ 44 धावांत गमावल्या. रेहान अहमद (3/88) आणि टॉम हार्टले (4/77) या त्यांच्या फिरकीपटूंमुळे इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले. अहमद आणि हार्टले यांनी परिस्थितीचा चांगला उपयोग केला ज्याचे त्यांना भरपूर लाभांश मिळाले. या कसोटीत शेवटची फलंदाजी करताना आणि लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्यांनी दमदार सुरुवात केली आहे. सलामी जोडी झॅक क्रॉली आणि बेन डकेट (28) यांच्यात 50 धावांची भागीदारी झाली. इंग्लंडने एकूण 14 षटकांत एक गडी गमावून 67 धावा केल्या. पहिल्या डावात अर्धशतक करणारा क्रॉली 29 धावांवर फलंदाजी करत असून त्याच्या बरोबर जोडीला नाईट वॉचमन म्हणून आलेला अहमद (नाबाद 9) आहे. तीन दिवसांच्या रोमांचक क्रिकेटनंतर सामना समान रीतीने बरोबरीत असल्याने, चौथ्या दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600