क्रीडा
भारताची नजर आठव्यांदा महिला आशिया चषक जिंकण्याकडे
या महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेतील दोन अपराजित संघ रविवारी रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम फेरीत आमनेसामने येतील. एकीकडे असेल सात वेळा ही स्पर्धा जिंकलेले भारत तर दुसरीकडे यजमान श्रीलंका.
आमने-सामने
भारताने श्रीलंकेविरुद्ध १९ टी-२० सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने भारताविरुद्ध फक्त चार. आशिया चषकात, श्रीलंकेने २०२२ च्या महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेच्या फायनलसह झालेल्या चार चकमकींमध्ये भारताला कधीही पराभूत केले नाही.
संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, तनुजा कंवर, सजना सजीवन
श्रीलंका: चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अमा कांचना, उदेशिका प्रबोधनी, विश्मी गुणरथने, काव्या कविंदी, इनोशी प्रियदर्शनी, सुगंधिका कुमारी, अचीनी कुलसूरिया, कावेला सिल्वानी, कवीशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, सचिनि निसानसाला, शशिनी गिम्हनी
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
स्मृती मानधना: भारताच्या या डावखुऱ्या सलामीवीराने बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीत अर्धशतक झळकावले. या स्पर्धेत ती चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आली. तिने तीन डावात १४३च्या दमदार स्ट्राइक रेटने ११३ धावा केल्या आहेत.
दीप्ती शर्मा: भारताच्या या ऑफस्पिनरने या स्पर्धेत चार सामन्यांत नऊ विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली आहे. ती प्रत्येक षटकात ४.५ धावांपेक्षा कमी धावा देऊन किफायतशीर गोलंदाजी करत आहे. तिला या स्पर्धेत अद्याप फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी बॅटसह तिच्या कौशल्याबद्दल शंका नाही.
चामारी अथापथु: श्रीलंकेची कर्णधार चार सामन्यांत २४३ धावांसह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने चारपैकी तीन सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. तिच्या फलंदाजीसोबतच ती ऑफ स्पिन गोलंदाजीने मौल्यवान योगदान देऊ शकते.
कविशा दिलहारी: ही श्रीलंकेची अष्टपैलू खेळाडू सात विकेट्ससह या स्पर्धेत तिच्या संघासाठी आघाडीची विकेट घेणारी खेळाडू आहे. तिने या स्पर्धेत खूप धावा केल्या नसतील पण तिच्या फलंदाजीच्या प्रतिभेचे पुरेसे पुरावे आहेत.
खेळपट्टी
खेळपट्टीवर धावांचा वर्षाव होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि श्रीलंकेचे धडाकेबाज फलंदाज येथे फलंदाजीचा करण्याचा आनंद लुटतील. तथापि, ढगाळ आणि हवेशीर वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांना आणि फिरकीपटूंना मदत होऊ शकते.
हवामान
हवामान ढगाळ (१००% ढगांचे आच्छादन) आणि सुमारे २९ अंश सेल्सिअस तापमानासह हवेशीर असेल. पावसाची ४२% शक्यता आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: २८ जुलै २०२४
वेळ: दुपारी ३:०० वाजता
स्थळ: रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डंबुला
प्रसारण: डिस्नी + हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600