क्रीडा

सुरुवात केली कांगारूंना हरवून, शेवट करू का विश्वचषक जिंकून?

तीनपैकी दोन वेळा जिंकलेला भारत १९ नोव्हेंबर रोजी चौथा विश्वचषक फायनल खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘मेन इन ब्लू’चा सामना होईल. अव्वल दर्जेच्या फॉर्ममध्ये असलेला भारत स्टेडियममधील १,३०,००० चाहत्यांच्या मोठ्या पाठिंब्याने मैदानात उतरेल. त्याचबरोबर त्यांचे जगभरात पसरलेले एक अब्ज चाहते अपेक्षेने सामना पाहतील. ५० षटकांच्या विश्वचषक फायनलमध्ये या दोन संघांची शेवटची भेट २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाली होती, जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पराभव केला होता. राहुल द्रविड तेव्हा एक खेळाडू म्हणून भारतीय संघाचा भाग होता आणि आता प्रशिक्षक म्हणून संघाचा भाग आहे. द्रविड आणि भारत २० वर्षांनंतर बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघासोबत बदला घेऊ शकतील? जर भारत यशस्वी झाला तर ते यजमान आणि दोनदा विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनेल.   भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी १९८० पासून एकमेकांविरुद्ध १५० एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने ५७ जिंकले आहेत, ऑस्ट्रेलियाने ८३ जिंकले आहेत आणि १० सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी एकमेकांविरुद्ध ७१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी ३३ जिंकले आहेत आणि पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध ८-५ अशी आघाडी आहे.
  भारत ऑस्ट्रेलिया
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने ५७ ८३
भारतात ३३ ३३
विश्वचषकात
  आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील भारत आणि ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची कामगिरी भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली. अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या या स्पर्धेत १० पैकी १० सामने जिंकून भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने दोन पराभवांसह स्पर्धेची सुरुवात केली. त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला, ज्यांना त्यांनी नंतर उपांत्य फेरीत पराभूत केले आणि भारत, ज्यांना ते अंतिम फेरीत भेटतील. पहिल्या दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने मागे वळून पाहिले नाही आणि पुढील सात सामने जिंकले.
सामना क्रमांक भारत ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव भारताकडून ६ विकेटने पराभव
अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव
पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव
बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव
न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव
इंग्लंडचा १०० धावांनी पराभव न्यूझीलंडचा ५ धावांनी पराभव
श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव इंग्लंडचा ३३ धावांनी पराभव
दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव अफगाणिस्तानचा ३ विकेटने पराभव
नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव बांगलादेशचा ८ विकेटने पराभव
सेमी फायनल न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव दक्षिण आफ्रिकेचा ३ विकेटने पराभव
    संघ भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा. ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.   दुखापती अपडेट्स                             भारत आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या अंतिम सामन्यापूर्वी दुखापतीची चिंता नाही.   खेळण्याची परिस्थिती अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा सामना हे ठिकाण आयोजित करेल. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळल्या गेलेल्या चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. या विश्वचषकात येथे सर्वाधिक धावसंख्या २८६ आणि सर्वात कमी धावसंख्या १९१ आहे. या ठिकाणी काळ्या आणि लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत. काळ्या मातीच्या खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल असतात कारण चेंडूचा बाऊंस सम असतो. लाल मातीच्या खेळपट्ट्या गोलंदाजांना, विशेषत: फिरकीपटूंना अनुकूल असतात, कारण चेंडूचा उसळी संथ आणि कमी असते.   हवामान हवामानात भरपूर सूर्यप्रकाश दिसण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आवरण राहणार नाही आणि पावसाची शक्यता नाही. ईशान्येकडून वारे वाहतील.   ‘पॉवरप्ले’ ची (०-१० षटके) तुलना भारताने सामन्याच्या पहिल्या १० षटकात सरासरी ६९ धावा केल्या आहेत आणि दोन विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने ६६ धावा केल्या आहेत आणि १.३ विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या १० षटकांमध्ये दोन्ही संघांनी केलेल्या धावसंख्येमध्ये फार काही फरक नसला तरी, दोन्ही संघांच्या नवीन चेंडूंच्या गोलंदाजांनी घेतलेल्या विकेट्समध्ये लक्षणीय फरक आहे. पहिल्या १० षटकात भारताच्या २०, तर ऑस्ट्रेलियाच्या १३ विकेट आहेत.  
सामना क्रमांक भारत ऑस्ट्रेलिया
  फलंदाजी गोलंदाजी फलंदाजी गोलंदाजी
२७/३ ४३/१ ४३/१ २७/३
९४/० ४८/१ ५०/३ ५३/०
७९/२ ४९/० ६४/२ ५१/०
६३/० ६३/० ८२/० ५९/०
६३/० ३४/२ ६६/१ ४८/३
३५/२ ४०/४ ११८/० ७३/२
६०/१ १४/६ ४८/२ ३८/२
९१/१ ३५/३ ५२/४ ४६/१
९१/० ६२/१ ५८/१ ६२/०
सेमी फायनल ८४/१ ४६/२ ७४/२ १८/२
  अव्वल तीन फलंदाज आणि गोलंदाज या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा आणि विकेट घेणारा आघाडीचा खेळाडू भारताचा आहे हे तथ्य या संघाच्या वर्चस्वाचे प्रमाण सांगते. विराट कोहली ७११ धावांसह अव्वल स्थानावर आहे आणि मोहम्मद शमी २३ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. २२ विकेट्ससह ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा शमीच्या फार काही मागे नाही. तथापि, फलंदाजी विभागात, डेव्हिड वॉर्नर, ज्याच्या ५००+ धावा आहेत आणि काही प्रमाणात मिचेल मार्श (४००+ धावा) व्यतिरिक्त (ग्लेन मॅक्सवेलचे ते चमत्कारिक द्विशतक सोडून) ऑस्ट्रेलियाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला फारसे योगदान देता आले नाही.  
  भारत ऑस्ट्रेलिया
  फलंदाज गोलंदाज फलंदाज गोलंदाज
विराट कोहली - ७११ धावा मोहम्मद शमी - २३ विकेट्स डेव्हिड वॉर्नर - ५२८ धावा अॅडम झाम्पा - २२ विकेट्स
रोहित शर्मा - ५५० धावा जसप्रीत बुमराह - १८ विकेट्स मिचेल मार्श - ४२६ धावा जोश हेझलवूड - १४ विकेट्स
श्रेयस अय्यर - ५२६ धावा रवींद्र जडेजा - १६ विकेट्स ग्लेन मॅक्सवेल - ३९८ धावा मिचेल स्टार्क - १३ विकेट्स
  या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया जेव्हा एकमेकांविरुद्ध आले तेव्हा…. योगायोगाने भारत आणि ऑस्ट्रेलियाने एकमेकांविरुद्ध खेळून त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली आणि आता त्याच पद्धतीने स्पर्धेचा शेवट करतील. ८ ऑक्टोबर रोजी, चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा भारताने ४१.२ षटकात २०० धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांनी अनुक्रमे ४१  आणि ४६ धावांची खेळी केली, तथापि भारताची फिरकी जोडी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी पाच विकेट्स घेऊन कमालीचे प्रदर्शन केले. भारताने प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीला स्वस्तात गमावल्यानंतरही विराट कोहली (८७) आणि केएल राहुल (९७ नाबाद) यांनी संघाचा डाव सावरला. जोश हेझलवूड (३ विकेट्स) आणि मिचेल स्टार्क (१ विकेट) यांनी नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी केली, मात्र त्यांना गोलंदाजांकडून फारशी साथ मिळाली नाही.   या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया जेव्हा अहमदाबाद येथे खेळले तेव्हा…. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एक सामना खेळले. भारताने पाकिस्तानचा सामना केला आणि १९२ धावांचा पाठलाग करताना त्यांचा सात विकेट्स राखून पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध २८६ धावांचा बचाव करून त्यांना ३३ धावांनी पराभूत केले.  भारताचा जसप्रीत बुमराह (सात षटकात १९/२) आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा (१० षटकात २१/३) त्यांच्या चमकदार गोलंदाजी प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार जिंकला.   आकड्यांचा खेळ
  • मोहम्मद शमीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ६ विकेट्सची गरज आहे
  • जसप्रीत बुमराहला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे
  • डेव्हिड वॉर्नरला (६) विश्वचषकातील सर्वाधिक शतके करणाऱ्या रोहित शर्माची (७) बरोबरी करण्यासाठी एका शतकाची आवश्यकता आहे. वॉर्नरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण करण्यासाठी ७५ धावांची आवश्यकता आहे
  • ग्लेन मॅक्सवेलला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी १०१ धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्यासाठी १०७ धावांची गरज आहे
  सामन्याची थोडक्यात माहिती तारीख:  १९ नोव्हेंबर २०२३ वेळ: दुपारी २:०० वाजता स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार     (सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600